Saturday, June 8, 2024

अँड्रॉइड जनरेशन

अँड्रॉइड जनरेशन

सध्याच्या युगामध्ये साधारणता 2000 सालानंतर जन्माला आलेले सर्व बालक हे अँड्रॉइड जनरेशन मध्ये येतात. या जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेले आकर्षण दिसून येते, त्या पश्चात पाठीमागे राहिलेली शेवटची पिढी 2000 सालाच्या अगोदर जन्मलेले की ज्यांना आपण वाय जनरेशन असे म्हणतो आणि दुसरे म्हणजे झेड जनरेशन की, ज्या जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला संस्कार नावाची ही गोष्ट शेवटची दिसून येते. तसेच या अँड्रॉइड जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला संस्कार नावाची गोष्ट प्रादुर्भावाने आढळल्यास मिळते. एकापेक्षा जास्त लाइफ पार्टनर असणे ही तर सध्या तरुणांमध्ये वाढत चाललेली क्रेझ आहे. कपड्यांमध्ये आलेली विविधता यावरून असे समजते की स्त्रिया या पूर्णतः पुरुषांच्या कपड्यावरती विसंबून आहे, परंतु पुरुष हे स्त्रियांचे कपडे अजून परिधान करू शकले नाही. तर संभोग ही एक प्रक्रिया नसून, एक दैनंदिन क्रिया आहे असा या व्यक्तींचा संभ्रम निर्माण झाला आहे(असं त्यांना कदाचित वाटत असेल). सध्याची मुलं ही जास्त प्रमाणात हट्टी झालेली आहे. आई-वडिलांचे कदाचित त्यांच्यावरती दुर्लक्ष झाले असे म्हणावे लागेल. परंतु हे मुलं त्यांच्या आई-वडिलांचे ही ऐकत नाही आणि शिस्तीच्या बाबतीत या ठिकाणी पालकांचा समतोल ढासळलेला दिसतो. या इन्स्टंट जनरेशनच्या मुलांना सर्व काही तात्काळ पाहिजे असते, म्हणजे की पिझ्झा अर्ध्या तासांमध्ये, व्हिडिओ पंधरा सेकंदामध्ये त्यामुळे त्यांची भविष्याप्रती असलेली ओढ ही चिंताजनक बनलेली आपल्याला आढळल्यास मिळते. याउलट आपण जर युरोपियन, अमेरिकन देशांमधील मुला-मुलींचे उदाहरणे घेतले तर तेथील मुलं हे पेट्रोल पंप, पिझ्झा डिलिव्हरी, गार्डनिंग, हात गाडीवरील फास्ट फुडचे दुकान, तसेच दिवसभरातील सर्व कष्टाची कामे हे आवडीने करतात आणि स्वतःचा खर्च भागवतात. त्या देशातील मुले हे आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलतात तर पालक हे फक्त वयाच्या वीस वर्षापर्यंत मुलांचे संभाळ करतात आणि पुढे त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी मोकळीक देतात. परंतु आपल्याकडे मुलांप्रती असलेल्या पालकत्व हे त्याच्या जन्मापासून त्याचे शिक्षण त्याचं लग्न करून देणे तसेच ते नातवंड आणि त्यांच्या अखेरीच्या क्षणापर्यंत आई-वडील हे पूर्णतः मुलांचा संभाळ करण्यापर्यंत आपला आयुष्य घालवतात. परिणामी पालकांना मुलांप्रती विरोधात्मक व्यवहार बघावयास मिळतो. त्यामुळे पालकांनी हा दृष्टिकोन बाळगू नये की आपली मुलं हे आपल्याला आयुष्यभर सांभाळतील आणि मुलांनी असा हा आग्रह धरू नये आपले पालक आपल्याला आयुष्यभर सांभाळतील त्यामुळे वेळोवेळी या अँड्रॉइड जनरेशनची पाळे-मुळे ओळखून आपल्या व्यवहारांमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. तरच आपण संज्ञानी पालक किंवा सुज्ञानी मुलं-मुली म्हणून समोर येऊ शकु. भविष्याचा जर विचार केला तर सध्याचे अल्फा जनरेशन(2010 नंतर जन्माला आलेले) यांचा भविष्यकाळ कदाचित वाईट असु शकतो. 2040 नंतरच यांना आपल्या अस्तित्वाची खरी ओळख पटू लागेल, म्हणजेच आयुष्याची काही वर्ष गेल्यानंतरच. जास्त संपत्ती असलेला मुलगा किंवा मुलगी शोधण्याचा हट्टामुळे खुप मुला मुलींचे आयुष्य हे उध्वस्त झाले. लग्नाच्या दोन-तीन महिन्यातच त्यांना माहेरी परत येऊन घटस्फोटाकडे निर्णय वळवावे लागले. समाजामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली याचा आपण जर विचार केला तर आपल्याला असे समजते की फक्त संपत्ती आणि वैभव बघून जर आपण निर्णय घ्यायला लागलो, तर आपले निर्णय फसण्याची शक्यता ही जास्त असते. याउलट आपण जर बुमर जनरेशन म्हणजेच 80 च्या दशकामधील बालकांचा विचार केला तर त्यांनी विवाह किंवा आयुष्य स्तब्धतेसाठी घेतलेले निर्णय हे शांतपणे आणि भविष्याचा विचार करून घेतलेले दिसतात. कारण त्याकाळी घर नोकरी अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता व्यक्तीची कर्तुत्व सिद्धता बघितली जायची. सध्याच्या मुला मुलींमध्ये कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची क्षमता तर आहे परंतु कुठेतरी संस्कार कमी पडल्याचे आपल्याला दिसून येते. हेच संस्कार पालकांप्रतीही बदलल्याचे दिसते माध्यमांच्या जास्त आहारी गेल्यामुळे पालकांचं पाल्याकडे दुर्लक्ष कमी झाले आहे हे पालकांना मान्यच करावे लागेल. दर दहा वर्षाला बदलणाऱ्या करिअरच्या वाटा या आपल्याला कदाचित योग्य ठिकाणी नेऊ शकणार नाही परंतु आपल्याकडे असलेले संस्कार हे आपल्याला योग्य ठिकाणी नेण्यासाठी भाग पाडतात. शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन नाही तर शिक्षण हे माणसाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि बौद्धिक क्षमतांचा वाढीसाठी असते. त्यामुळे शाळेला पूर्वी जीवन शिक्षण विद्या मंदिर असं नाव होतं, परंतु आत्ता सध्या शिक्षणाकडे सर्रास आपण उपजीविकेचे किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी कशी भेटेल या दृष्टिकोनातून बघत आहे. आणि हे संस्कार तुम्हाला पैसे देऊन घडवून आणता येणार नाही त्यासाठी मूल्य आधारित विचारांची जडणघडण ही त्या बालकावर बाल्यावस्थेपासूनच होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यकाळ कसा असेल याची आपल्यासमोर उदाहरणे आहेच.



                             ‌ 

1 comment: